Saturday, February 19, 2022

३९२ वी शिवजयंती!!!🚩🌺🌸🙏

आज_शिवजयंती_शिवस्मरणाचा_पुण्यदिन :-
                  खरंतर छत्रपती शिवरायांचे स्मरण हे काही एक तारखेला ,एका तिथीला करण्यासारखे नाही.छत्रपती शिवराय तर आम्हाला नित्यस्मरणीय नित्यवंदनीय आहेत आणि त्यांच्या प्रज्वलित पवित्र अग्निरुप चरित्राचे चिंतन प्रत्येकाने रोजच करायला हवे.तरी आज थोरल्या महाराजांचा जन्म म्हणजे आम्हा लोकांचा सणचं आहे.श्रीसमर्थांनी थोरल्या महाराजांचे वर्णन अतिशय यथार्थ शब्दात केले आहे, 

या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।। 
                            खरंच या शब्दांचे चिंतन केले तर लक्षात येतंच की आजवर छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून ३९२ वर्ष झाले पण दुसरे कुणीही असा अलौकिक पराक्रम, अलौकिक चरित्र आणि एकमेवाद्वितीय लौकिक  मिळवू शकला नाही.हिरव्या गडद अंधारात जिथे कुठेही दुरपर्यंत धर्माच्या काजव्यांचा ही प्रकाश अस्तित्वात नव्हता तिथे थोरल्या महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे माॅं साहेबांचे स्वप्न बघितलेच नाही तर ते सत्यात उतरवले , हिंदवी स्वराज्याची स्थापना जी केवळ अशक्यप्राय गोष्टी होती ती साकार करुन दाखवली. "संभवामी युगे युगे" या गीतेतील भगवंतांच्या वचणाला सार्थ करणारे धर्मरक्षकचं महाराज होते यात शंका नाही. थोरल्या महाराजांचा जन्म जर झाला नसता तर आज हिंदू धर्माचे काय स्वरुप झाले असते याचा विचार ही करणे अवघड आहे. कवी भूषणांनी आपल्या शिवबावनी या रचनेत फारच सुंदर शब्दात थोरल्या महाराजांच्या चरित्राचे महत्व प्रतिपादन केले आहे ते म्हणतात,

पीरा पयगम्बरा दिगम्बरा दिखाई देत,
सिद्ध की सिधाई गई, रही बात रब की।
कासी हूँ की कला गई मथुरा मसीत भई
शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी॥
कुम्करण असुर अवतारी औरंगजेब,
कशी प्रयाग में दुहाई फेरी रब की।
तोड़ डाले देवी देव शहर मुहल्लों के,
लाखो मुसलमाँ किये माला तोड़ी सब की॥
भूषण भणत भाग्यो काशीपति विश्वनाथ
और कौन गिनती में भुई गीत भव की।
काशी कर्बला होती मथुरा मदीना होती
शिवाजी न होते तो सुन्नत होती सब की ॥
    ‌
        या शब्दांचे गांभिर्य हे फक्त शिवचरित्राचे वाचन,चिंतन केल्याशिवाय लक्षातच येणार नाही.शिवप्रभुंचे रुप,त्यांचे जिवन , त्यांची धर्मनिष्ठा हे सर्व प्रत्येकाने अभ्यासलेच पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते शिवगंध, गाडीवरील स्टिकर , राजकारण या दिखाव्यापुरतेच मर्यादित न राहता शिवचरित्र हे रक्तात भिनायलाच पाहिजे..कारण "ज्यांच्या रक्तात शिवचरित्र भिनले त्यांचे चरित्र उज्वल बनले" हेच एकमात्र सत्य आहे.शिवचरित्र हे धर्माभिमान, धर्मनिष्ठा, पराक्रम,शौर्य, कर्तुत्व आणि सकारात्मकतेची खाणचं आहे यात शंका नाही. शिवप्रभु हे आम्हा हिंदूंचे दैवत आणि आम्ही हिंदू आमच्या दैवतांचे जन्मदिवस नाही तर जयंती साजरा करतो ते ही तिथीनुसार . तरी मागे मी लिहिल्याप्रमाणे आम्हाला शिवजयंती तारीख आणि तिथीचे काय तर दिवस,वार, नक्षत्रानेही साजरी करायला हरकत नाही.एवढेच काय तर याच तारीख,दिवस आणि नक्षत्रावर आम्ही शिवजयंती ही दर महिन्याला साजरी करायला हवी कारण एक दिवस काय तर प्रत्येक क्षण हा छत्रपती शिवरायांच्या स्मरणांचा आहे.
      ✒️✍️अक्षय जाधव आळंदी ✍️✒️

||दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत अष्टप्रधानवेष्टीत न्यायालंकारमंडीत शस्त्रास्त्रशांस्त्रपारंगत
राजनीतीधुरंधर पौढप्रतापपुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजमान्यराजश्री अखंडलक्ष्मीअलंकृत महापराक्रमी महाप्रतापी जाणते राजे
महाराजाधिराज श्री श्री श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय||

विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंतीच्या सर्व बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!

जय भवानी जय शिवराय 🚩🙏🌸🌺

No comments:

Post a Comment

कथा ज्ञानदेवांची भाग २ 🙏🏻🌸

  #कथा_ज्ञानदेवांची_भाग२ :-               ज्ञानदेवांच्या कुळावरील नाथ संप्रदायाची कृपा :-                           नाथ संप्रदाय हा आपल्या भ...